|
Body Background:
|
Body text color:
|
|
Links Color:
|
CONTENT Color:
|
|
Color suggestions:
|
|
TOP/FOOTER COLOR: |
|
|
T/F BG Color:
|
T/F BG opacity:
|
HEADER/BOTTOM COLOR: |
|
|
H/B BG Color:
|
H/B BG opacity:
|
भिलवडी हे सांगली जिल्ह्यातील एक महत्वाचे प्रगतशिल गाव आहे. भिलवडीस ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षिणक परंपरा लाभली आहे. १९३९ साली झालेल्या वैयक्तिक सत्याग्रहमुळे भिलवडी गाव इतिहासात अजरामर झाले.
भिलवडी मध्ये कृष्णा नदीतीरी भिलवडीच्या सोंदर्यात आणि वैभवात भर घालणारा असा घाट आहे. हा घाट पटवर्धन सरकारांच्या काळात बांधण्यात आला आहे जो आज प्रांत मजबूत स्थिथीमध्ये जशाचा तसा आहे.
शिक्षण हि आजच्या काळातील सर्वात महत्वाची गरज आहे. भिलवडी मध्ये शिक्षणाच्या विविध सुविधा उपलब्ध आहेत म्हणजेच अगनवाडी पासून ते उच्च माध्यमिक पर्यंत शिक्षणाच्या सोयी उपलब्ध आहेत.
भिलवडी गाव बाराम्हीने वाहणाऱ्या कृष्ण नदीच्या तीरावरती बसले असल्याने शेतीसाठी लागणारे वातावरण आणि पाणी मोठ्याप्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळे येथील शेती चांगल्या प्रमाणात उत्पन देते.
वेबसाईट बद्दल आपला अभिप्राय, आपल्या सूचना आणि भिलवडी संदर्भात अधिक माहिती आम्हाला जरूर कळवा. खालील इमेल वर : pradip@bhilawadi.com / info@layersinfo.com
डेवलपमेंट टीम // लेयर्स इन्फोटेक
वेबसाईट संदर्भात अधिक माहितीसाठी पुढील नंबर्स वरती संपर्क करू शकता : राहुल ( ९०२११२४५०७ ), अमित (९०२१९७८५४५ ), प्रदीप (९३२६७६३६९२)
अधिक माहितीसाठी // संपर्क करा
भिलवडी हे सांगली जिल्ह्यातील एक महत्वाचे प्रगतशिल गाव आहे. भिलवडीस ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षिणक परंपरा लाभली आहे. १९३९ साली झालेल्या वैयक्तिक सत्याग्रहमुळे भिलवडी गाव इतिहासात अजरामर जाले. तसेच स्वातंत्र्य लड्यामधे येथील स्वातंत्र्य सैनिकांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. अश्या रितीने स्वातंत्र्यलड्यामधे महत्वपूर्ण भूमिका पार पाडणारा व ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या भिलवडी गावाचा विकास स्वातंत्र्या नंतर झाला. त्याचाच परिणाम म्हणून सामाजिक व आर्थिक, राजकीय, शैक्षणिक बदल या गावात घडून आले. भिलवडी हे गाव सांगली जिल्ह्यातील एक महत्वात्चे गाव असल्याने सांगली जिल्ह्यात हे गाव प्रसिद्ध आहे. भिलवडी हे सांगली पासून २५किमी अंतरावर व भिलवडी स्टेशन पासून पश्चिमेस ३.५किमि अंतरावर आहे. भिलवडीचे उत्तर अक्षांश १६°५९'१९.७६" व पूर्व रेखांश ७४°२८'१०.९५" इतके आहे. भिलवडी गावाचे एकुण क्षेत्र २.३९२ हेक्टर इतके आहे. भिलवडी गावातून कृष्ण नदी वाहते. गावाची पूर्वपश्चिम लांबी २३०० फुट व दक्षिणोत्तर रुंदी २००० फुट आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे उतार आहे. या गावाखाली सभोवार १२ वाडया आहेत. त्यापैकी ८ वाडयाना वस्ति असून बाकी सर्व नष्ट झाल्या आहेत.
भिलवडीला प्राचीन इतिहास आहे. गुरुचरित्र ग्रंथात भिलवडीचा उल्लेख आढळून येतो. मध्ययुगीन काळी भिलवडीवर विजापुरकरांचे वर्चस्व होते. सन १६७३ मध्ये शिवाजी महाराजांनी हा प्रदेश काबीज केला. सन १६७४ ,मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी या भागावर मराठ्यांचे वर्चस्व होते. भिलवडीला खरे महत्व पेशवे काळात आले होते. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे सन १७७९ मध्ये परशुराम भाऊ पटवर्धन यांनी कृष्णा नदीवरील बांधलेला घाट. या घाटाने २३३ वर्षे पूर्ण केली आहेत. वास्तुशिल्पाचा वैशिष्ट्य पूर्ण नमुना असलेला असा हा घाट कृष्णेच्या उगमापासून कोठेही आढळत नाही.
भिलवडीचा विकास होण्यामध्ये राजकीय नेतृत्वाबरोबरच ग्रामपंचायतीच्या सहभागाचाही विशेष उल्लेख करावा लागेल. विविध शासकीय योजना राबविण्यात ग्रामपंचायतीचे योगदान दिसून येते. ग्रामपंचायतीच्या कार्यामुळेच भिलवडीस विविध योजनांमध्ये पुरस्कार मिळाले आहेत. भिलवडी गावास संत गाडगेबाबा स्वच्छता पुरस्कार, निर्मलग्राम पुरस्कार, दलित योजना सुधारणा पुरस्कार मिळाले आहेत.
प्रदीप चौगुले
मोबा. : +(९१)९३२६७६३६९२
ईमेल : pradip@bhilawadi.com
www.bhilawadi.com
www.layersinfo.com